यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 13
ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः
देवता - इन्द्रो देवता । अग्निः यज्ञो देवता
छन्दः - निचृत् उष्णिक्,भूरिक् आर्ची गायत्री,भुरिक् उष्णिक्,
स्वरः - ऋषभः
1
यु॒ष्माऽइन्द्रो॑ऽवृणीत वृत्र॒तूर्य्ये॑ यू॒यमिन्द्र॑मवृणीध्वं वृत्र॒तूर्ये॒ प्रोक्षि॑ता स्थ। अ॒ग्नये॑ त्वा॒ जुष्टं॒ प्रोक्षा॑म्य॒ग्नीषोमा॑भ्यां त्वा॒ जुष्टं॒ प्रोक्षा॑मि। दैव्या॑य॒ कर्म॑णे शुन्धध्वं देवय॒ज्यायै॒ यद्वोऽशु॑द्धाः पराज॒घ्नुरि॒दं व॒स्तच्छु॑न्धामि॥१३॥
स्वर सहित पद पाठयु॒ष्माः। इन्द्रः॑। अ॒वृ॒णी॒त॒। वृ॒त्र॒तूर्य्य॒ इति॑ वृत्र॒ऽतूर्य्ये॑। यू॒यम्। इन्द्र॑म्। अ॒वृ॒णी॒ध्व॒म्। वृ॒त्र॒तूर्य्य॒ इति॑ वृ॒त्र॒ऽतूर्य्ये॑। प्रोक्षि॑ता॒ इति॒ प्रऽउ॑क्षिताः। स्थ॒। अ॒ग्नये॑। त्वा॒। जुष्ट॑म्। प्र। उ॒क्षा॒मि॒। अ॒ग्नीषोमा॑भ्याम्। त्वा॒। जुष्ट॑म्। प्रऽउ॒क्षा॒मि॒ ॥ दैव्या॑य। कर्म॑णे। शु॒न्ध॒ध्व॒म्। दे॒व॒य॒ज्याया॒ इति॑ देवऽय॒ज्यायै॑। यत्। वः॒। अशु॑द्धाः। प॒रा॒ज॒घ्नुरिति॑ पराऽज॒घ्नुः। इ॒दम्। वः॒ तत्। शु॒न्धा॒मि॒ ॥१३॥
स्वर रहित मन्त्र
युष्माऽइन्द्रो वृणीत वृत्रतूर्ये यूयमिन्द्रमवृणीध्वँ वृत्रतूर्ये प्रोक्षिता स्थ । अग्नये त्वा जुष्टम्प्रोक्षामियग्नीषोमाभ्यान्त्वा जुष्टम्प्रोक्षामि । दैव्याय कर्मणे शुन्धध्वन्देवयज्यायै यद्वोशुद्धाः पराजघ्नुरिदँवस्तच्छुन्धामि ॥
स्वर रहित पद पाठ
युष्माः। इन्द्रः। अवृणीत। वृत्रतूर्य्य इति वृत्रऽतूर्य्ये। यूयम्। इन्द्रम्। अवृणीध्वम्। वृत्रतूर्य्य इति वृत्रऽतूर्य्ये। प्रोक्षिता इति प्रऽउक्षिताः। स्थ। अग्नये। त्वा। जुष्टम्। प्र। उक्षामि। अग्नीषोमाभ्याम्। त्वा। जुष्टम्। प्रऽउक्षामि॥ दैव्याय। कर्मणे। शुन्धध्वम्। देवयज्याया इति देवऽयज्यायै। यत्। वः। अशुद्धाः। पराजघ्नुरिति पराऽजघ्नुः। इदम्। वः तत्। शुन्धामि॥१३॥
विषय - पूर्व मंत्रामधे सांगितलेले जल कोण-कोणत्या प्रकारचे आहेत व इन्द्र आणि वृत्राचे युद्ध कसे व कोणत्या रीतीने होते, हे पुढील मंत्रात सांगितले आहे -
शब्दार्थ -
शब्दार्थ - हा (इन्द्रः) सूर्य अथवा सूर्यलोक ज्याप्रमाणे (वृत्रतूर्य्ये) मेघाचा वध करण्याकरिता म्हणजे मेघातून जल काढून घेऊन जणू त्याचा वध करतो. (युष्माः) पुर्वोक्त जलाचा (अवृणीत) स्वीकार करता तसेच ज्याप्रमाणे हे जल (इन्द्र) वायूचा (अवृणीध्वम्) स्वीकार करते, म्हणजे वायूमधे मिसळून जराशी शीतलता प्राप्त करून देते त्याजप्रमाणे हे मनुष्यांनो, तुम्ही देखील त्या जल, औषधि, रसांना शुद्ध करण्यासाठी (वृत्रतूर्य्ये) तीव्र वेगाने जाणार्या मेघाच्या सहाय्याने (प्रोक्षिताः) भौतिक पदार्थांना सिंचित करणार्या जलाचल (अवृणीध्वम्) स्वीकार करा (जलापासून लाभ घ्या) आणि ज्याप्रमाणे ते जल शुद्ध होतात, त्याप्रमाणे तुम्ही दोकील शुद्ध व्हा. याकरिता यज्ञाचे अनुष्ठान करणारा मी (दैव्याय) सर्वांना शुद्ध करणारे जे पाच प्रकारचे कर्म आहेत (कर्मणे) म्हणजे उत्क्षेपण-वर फेकणे, अवक्षेपण-खाली टाकणे, आकुंचन-संकोच पावणें, प्रसारण-पसरविणे, गमन-जाणे अथवा चालणे, या पाच कर्मांद्वारे तसेच (देवयज्यायै) विद्वज्जनांच्या व श्रेष्ठगुणांच्या दिव्य-क्रियेसाठी व (अग्नेय) भौतिक अग्नीपासून सुख-सोय प्राप्त करण्यासाठी (जुष्टम्) उत्तम क्रियांद्वारे जे प्राप्तव्य आहे, अशा (त्वा) त्या यज्ञाचे अनुष्ठान (प्रोक्षामि) करतो तसेच अग्नी आणि सोम यांच्यापासून वृष्टी प्राप्त करण्यासाठी (जुष्टं) प्रीतिकारक व प्रीतीने सेवनीय अशा (त्वा) यज्ञाला (प्रोक्षामि) मी मेघमंडलामधे नेतो. या रीतीने यज्ञाद्वारे शुद्ध होणारे जल (शुन्धध्वं) उत्तम प्रकारे शुद्ध होतात. (यत्) कारण की जलाचे अशुद्धी आदी दोष यज्ञाद्वारे सर्वोत्कृष्टपणे (पराजघ्नुः) दूर होतात. (तत्) मी यज्ञ करून जलास (शुंधामि) उत्तम प्रकारे शुद्ध करतो. हा या मंत्राचा प्रथम अर्थ आहे. ^द्वितीय अर्थ असा - हे यज्ञ करणार्या मनुष्यांनो, (यत्) ज्या उद्देशासाठी (इन्द्रः) सूर्य (वृत्रतूर्य्ये) मेघाचा वध करतो (युष्माः) ते पूर्वोक्त जल (इन्द्र) वायूचा (अवृणीत) स्वीकार करते. ज्याप्रमाणे सूर्याने (वृत्रतूर्य्ये) मेघाला शीघ्रगामी करून (युष्माः) त्या पुर्वोक्त जलाला (प्रोक्षिताः) पदार्थांना सिंचित करणारा (स्थः) असा केला आहे, त्याप्रमाणे (यूयं) तुम्ही देखील वर्णित यज्ञाचा सदैव स्वीकार करून (नयत) शुद्धी रूप उद्दिष्टास प्राप्त करा. अशा प्रकारे आम्ही सर्व जणांनी (दैव्यास) श्रेष्ठ कर्मासाठी अथवा (देवयज्यायै) विद्वानांसाठी, दिव्य गुणांच्या प्राप्तीसाठी व (अग्नेय) परमेश्वराच्या प्राप्तीसाठी (जुष्टं) प्रिय असणार्या या यज्ञाचे (प्रोक्षामि) सेवन करावे. तसेच (अग्नीषोमाभ्यां) अग्नीने व सोमाने संपन्न होणार्या (त्वा) या यज्ञाला (प्रोक्षामि) आम्ही मेघमण्डलापर्यंत पाठवू. हे मनुष्यांनो, अशा प्रकारे यज्ञकर्माद्वारे तुम्ही सर्व पदार्थांना व सर्व माणसांना (शुन्धध्वम्) शुद्ध करा की (यत्) ज्यामुळे (वः) तुम्हांमधील अशुद्धताआदी दोष सदा (पराजघ्नुः) निवृत्त वा नष्ट होत राहावेत. त्याचप्रमाणे वेदांना प्रकट करणारा मी परमेश्वर तुम्ही सर्वांचे शोधन करतो म्हणजे शुद्धीकरणार्या प्रक्रियेला (शुन्धामि) चांगल्या प्रकारे वृद्धींगत करतो. ॥13॥
भावार्थ - भावार्थ - परमेश्वराने अग्नीची आणि सूर्याची रचना या उद्देशाने केली आहे की अग्नी आणि सूर्याने सर्व पदार्थामधे प्रविष्ट होऊन त्यांतील रसाला आणि पाण्याला छिन्न-भिन्न करावे की ज्यामुळे रस व जल वायुमंडळात जातील व पुन्हा पृथ्वीवर येऊन सर्वांना सुखी आणि शुद्ध करतील याकरिता सर्व माणसांसाठी हे आवश्यक आहे की उत्तम सुखाच्या प्राप्तीकरिता त्यांनी अग्नीमधे सुगंधित पदार्थांच्या आहुती द्यावात, त्याद्वारे वायु व वृष्टि-जलाची शुद्ध करून श्रेष्ठ सुखाच्या प्राप्तीसाठी मोठ्या प्रेमाने नित्य यज्ञ करावे. या उपायाने जगातील सर्व रोग आणि दोष नष्ट होतील आणि जगात शुद्ध व उच्च गुणांची वृद्धी होईल. या उद्दिष्टासाठी मी परमेश्वर तुम्हा सर्वांना आदेश करीत आहे की हे मनुष्यानो, तुम्ही उक्त यज्ञाद्वारे जगात शुद्धी करावी, परोपकार करण्यासाठी तुम्ही नित्य पवित्र कर्म करावेत. तसेच वर वर्णित रीतीने वायु, अग्नि आणि यांच्यातील गुणांचा शिल्पक्रियांमधे उपयोग करीत त्याद्वारे अनेक यान आदी यंत्रांची निर्मिती करून स्वपुरुषार्थाने सदैव सुखी राहावे/सुख उपभोगावे. ॥13॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal